कन्या’दान’ या प्रथेमागची नेमकी मानसिकता काय ?

कन्या’दान’ या प्रथेमागची नेमकी मानसिकता काय ?

कन्या’दान’ या प्रथेमागची नेमकी मानसिकता काय ?

ही प्रथा स्त्रीला 'वस्तू' मानणारी ठरते काय ? ती स्त्रीला सक्षम करणारी आहे की तिचं अवमूल्यन करणारी ?

फेसबुकवर प्रज्ञा जी म्हणतात...

कन्यादान ही अत्यंत वाईट प्रथा आहे. एक मुलगी कुणाला दान कशी करण्यात येऊ शकते? खरंतर महिलांची विदाई ही पुरुषाच्या घरी करणे ही चुकीची प्रथा आहे. जेव्हापर्यंत मुलेमुली स्वतंत्र राहण्याच्या लायकीचे होत नाही, केव्हा लग्न करतानादेखील मुलगा आणि मुलगी ही त्यांच्या स्वतंत्र घरात जावे, या मताची मी आहे. सासू-सासरे या घरात मुलींनी जाऊ नये. आता तरी अशा घटनांवरून तरी समजायला पाहिजे, पण समाज मात्र माझ्यासारख्या बोलणारीला दोष देतो. जॉईन्ट फॅमिली मध्ये राहणे मुलींना फार कठीण होऊन जाते. त्यात पुरुषाचेसुद्धा तारांबळ उडते. कोणाची बाजू घ्यावी हे त्याला सामाजीकरण झालेले नसते, म्हणून सरसकट मुलींनी स्थानांतरण नाकारावे. स्वतःच्या पायावर उभे राहणे ही पहिली अट. त्यानंतर स्वतःचे निर्णय स्वतः खंबीरपणे घेऊन स्वतः खंबीर बनावे. या केसमध्ये तिची जाऊ वाचली कारण ती थोडी खंबीर होती. घरातील लहान मुलांना नेहमी दाखवायचे असते की मी आई-वडिलांचा किती चांगला मुलगा आहे. कधी कधी मोठ्या मुलालाही मी किती जिम्मेदार आहे, हे दाखवायचे असते त्यासाठी ते बायकोवर हवे ते अत्याचार करू शकतात ...अनुभव....!

विनया सुशीला निपाणे यांनी म्हटलंय की...म्हणजे मरा, तिला हवी तशी वापरा ! पतीदेव छक्का निघाला तरी तिने तिथेच राहायचं परत माहेरी यायचं नाही. कोर्टाच्या पायऱ्या घासत राहायच्या पोलिसांच्या इथे जाऊन आलो तरी ते हाकलवणार. कोर्टात न्याय मागायला गेलो तर मधले एजंट वकील लोक त्या मुलीला वापरायला बघणार आणि नाही वापरू दिलं तर रखडवणार न्यायालयात न्याय मिळणार नाही आणि मिळाला तर ते वय निघून गेल्यावर मिळणार. म्हणून पूर्वीच्या म्हणण्यानुसार उभ्याने गेली तर आडव्यानेच बाहेर या, हे मुलींना म्हटलं जायचं आणि आजही वेगळं नाहीये काही, त्यामुळे जी मुलगी डेरिंग करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर समाजात कुठेच थारा राहत नाही. भटकत राहायचं दान केलेली वस्तू सामाजिक कौटुंबिक पातळीवर जळत राहील, जळत राहील !

कवयित्री योगीनी राऊळ यांनी मत मांडलंय की...कन्यादानाचा खरा, कागदोपत्री अर्थ आहे की माझ्या घरातल्या मुलीला मी नवऱ्याकडच्या घरी दान केलं. हे दान केल्यावर हातावर पाणी सोडलं जातं. पाणी सोडलं याचा अर्थ तिच्यावरचा हक्क सोडला, आता तो नवऱ्याकडच्या लोकांना दिला.
पण 'स्नुषादान' (सुनेचं दान) असा विधी नाही, म्हणजे सासरचा हक्क अंतिम आहे. हाच अर्थ आणि हीच मानसिकता अजूनही मुलीच्या लग्नाबद्दलची आहे. एक प्रकारे मुलींची जबाबदारी झटकून टाकण्याचा हा धार्मिक मार्ग आहे आणि तो भारतातल्या आईबापांना मान्य आहे. कन्यादान हे इतकं पुण्याचं काम मानलं गेलंय की स्वतःला मुलगी नसेल तर कुटुंबातील दुसऱ्या कोणाचीतरी मुलगी दान करण्याचं पुण्य लोक मिळवतात. तर हा खरा अर्थ. या एका विधीने आपण जीवंत व्यक्तीचं वस्तूत रुपांतर करतो आणि तिची मालकी बापाकडून नवऱ्याकडे ट्रान्स्फर करतो, हा सामाजिक अर्थ आणि तीच आईबापाची मानसिकता. हा रोजच्या जगण्यातला अर्थ. हे सगळं बंद व्हायला हवं असेल तर लग्न करणाऱ्या मुलामुलींना आधी त्याचा अर्थ कळायला हवा आणि त्यांनी तो आईबापांना सांगायला हवा. इतकं साधं जर मुलांचं आपण ऐकणार नसलो तर मुलांवर प्रेम वगैरे भंपक गोष्टी आईबाबांनी बोलूच नयेत. उद्विग्न करणारं आहे सगळं आणि लाडक्या बहिणींचे लाडके तोंडभर हसणारे भाऊ....

प्रभा तिरमारे यांचं म्हणणं आहे की Absolutely unaccepted.... Growing learned girls need to think to be independent, arrange their livelihood instead going to the boy's home. 'नांदणे means ready for any injustice. Boy-Girl together should plan & assertively connect both families for love & respect to self & others...Important issue !

माधुरी बर्डे मरकड यांनी कन्यादान ही भंपक प्रथा असल्याचं मत व्यक्त केलंय, तर मुग्धा धनंजय यांनी 'थोर कचरा संस्कृतीतला मुख्य कचरा' या शब्दात प्रथेची खिल्ली उडवलीय.

कन्या दान ..दान दिलेली वस्तु परत कुणी ती घेत नाही किंवा त्यावर हक्क सांगत नाही. जिवंत व्यक्तीला वस्तुप्रमाणे दान करणे अन् कन्यादानाला महत्व देणारे लोक यांची मानसिकता अशी असते, दिली गाय तीची आशा काय? असं प्रतिपादन संगीता मोहोड यांनी केलंय.

तुम्हालाही मत मांडायचं असेल तर पुढे दिलेली लिंक क्लिक करा :

https://www.facebook.com/share/p/16KgjGD4dm/

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account