मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मुंबई हे एक असे शहर आहे, जीला झोप येत नाही. जागेपणी स्वप्न बघणारी एकीकडे चकमक तर दुसरीकडे भयाण अंधार. मुंबई ही मायानगरी आज ६० वर्षाची झाली, हिला नेमकं चालवतं तरी कोण? उत्तर आहे मुंबईकर, हा मुंबईकर बंगला, बि.डी.डी चाळ, बिल्डिंग, झोपडपट्टीत राहणारा ; पण ह्यांना लागणाऱ्या सुविधा कोण पुरवत? तर महानगरपालिका.
सर्वात मोठे बजेट असलेली मुंबई महानगर पालिका जीची स्थापना १८८८ साली झाली. मुंबईची लोकसंख्या २२ मिलीयन, २२७ नगरसेवक, २४ प्रशासकीय वॉर्ड, ज्याचे बजेट ४० हजार करोड आहे. पण वास्तव मात्र वेगळे आहे, कारण मुंबईकरांची आजही सर्व बाबतीत यातायात होत आहे आणि ती होऊ नये म्हणून मुंबईतील मुंबईकर एकत्र येत आहोत हा बदल घडवण्यासाठी. ही भूमिका आहे मुंबई आमची – सामान्य माणसाची या अभियानाची !
१ मे रोजी मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाच्या भूमिकेचे पोस्टर सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलंय.
मुंबई हे सर्वांच्याच आशा – अपेक्षा आणि स्वप्नांचे शहर. मुंबईकरांच्या कष्टाने-श्रमाने मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनले, जागतिक बाजारपेठ बनलं. या स्वप्ननगरीमध्ये विषमतेची दरी वाढत आहे. ७० ते ८० टक्के लोकांचे राहणीमान निकृष्ट दर्जाचे होत आहे. या स्वप्न नगरी मुंबईची अशी भकास अवस्था का ? हा सवाल हे अभियान करतं.
मुंबई जितकी श्रीमंत – उच्चभ्रूंची आहे, तितकीच सामान्य माणसांची आहे. पण येथील श्रीमंत – उच्चभ्रूना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, सामान्य कष्टकऱ्यांना, लोकल ट्रेन – बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मिळतात का?
रस्त्यावर, फुटपाथवर व्यवसाय करणारे लाखो छोटे व्यापारी, झोपडपट्टी, SRA मध्ये राहणारे, घरकाम करणारे, अनेक असंघटीत मजुरांना, बालकांना, तृतीयपंथींना, दिव्यांगाना मुलभूत सोयी-सुविधांसाठी त्यांना तडजोड का करावी लागते? असं विचारत, खड्डेमुक्त -प्रदूषणमुक्त मुंबई मिळणे हा प्रत्येक मुंबईकरांचा अधिकार आहे, असं हे अभियान ठामपणे सांगतं.
‘मुंबई आमची – सामान्य माणसांची’ या अभिनयाचे मुख्य ध्येय म्हणजे मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि अधिकारांसाठी जागरूक करून लोकसहभागातून संघर्ष करण्यास प्रवृत्त करणे. त्याचबरोबर मुंबई ही जितकी उच्चभ्रू श्रीमंतांची आहे, तितकीच ती सामान्य माणसांची सुद्धा आहे याची जाणीव करून देणे. त्यातून मुंबईचे शासन – प्रशासन सामान्य माणसांसाठी दक्षपणे, सक्षमपणे आणि जबाबदारीने कार्यरत करणे हे ह्या अभियानाचे अंतिम ध्येय आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक वर्षा विद्या विलास, अमोल मडामे, डॉ.प्रभा तीरमरे, अविनाश पाटील, डॉ.वत्सला शुक्ला,भीम रासकर, अड.उदय शिरूर्वकर, राज असरोंडकर, दीपक सोनवणे, किरण सोलंकी, सुनील चौव्हाण, बिलाल खान, फहाद अहमद , संदेश लाळगे, किरण सोलंकी, खुशबू खान,(विकास) आशा पुजारी, सुशील शिंदे, प्रमोद शिंदे, देवेंद्र ठाकुर, जॉनसंन्स एबंझेर , अगस्तीन बेंजामिन, भानुप्रीया नाडर, प्रवीण दाभाडे, मुबारक अटपले, अरिश उमर, चाऊस शेख, वीरेंद्र दिवांर, निनाद पाटील, पंकज दळवी, किरण कदम, रमेश कदम, प्रतीक कांबळे, राजेश मोरे, अमोल निकाळजे, संतोष शिंदे, जमीला शेख, नागेश सुर्वे प्रोे.जालंदर अडसुले,योगिनी पगारे असे मुंबईत विविध प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते मुंबईकरांना ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत.
मुंबईत हे अभियान 227 वॉर्डांत राबविले जाणार आहे.
ज्यात 24 महानगरपालिकांच्या गेटवर मोठी पारदर्शक तक्रार पेटी ठेवावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे