Related Posts
मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
“वादळ येऊन 9 दिवस झाले. पण, राज्य सरकारची कोणतीही मदत मिळालेली नाही. प्रशासन प्रयत्न करीत असेल. पण, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. कुणाला मदत मिळते आहे, असे मला या दौर्यात दिसून आले नाही. शासन आणि प्रशासनाने अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्राला विशेषतः निसर्ग वादळाचा तडाखा बसला. यात रत्नागिरी, रायगड या दोन जिल्ह्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा करून मदत घोषित केली. त्यापाठोपाठ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोकणात पाहणी दौरे सुरू केले.
त्यातच आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.