मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आपात्कालीन परिस्थितीत विविध नियमांच उल्लंघन केल्यामुळे राज्यभरात १०८४८९ गुन्हे नोंदवले गेलेले आहेत, त्यात २०६२६ जणांना अटक झाली असून,५८५६८ वहानांची जप्ती करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत ४,३६,७४,८९४ रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात पोलिस हेल्पलाईनला मदतीसाठी येणा-या कॉल मध्ये सातत्याने वाढ होत आहे आतापर्यंत हेल्पलाईन नंबर १०० ला तब्बल ९२५९९ कॉल यंत्रनेने स्विकारलेले आहेत.
त्याचबरोबर अपात्कालीन परिस्थिती मध्ये अडकलेल्या लोकांना घरी जाण्यासाठी (महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र राज्याबाहेर) ३६८९७१ पासेस देण्यात आलेले आहेत. ह्या मध्ये विद्यार्थी, कामगार, नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. पासेस नसतानाही बेकायदा वाहतूक करणा-यावर विविध पोलिस स्टेशन अंतर्गत तब्बल १३०५ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
ह्या सर्व कामात पोलिस यंत्रणा काम करत असताना राज्यभरातील ११३० पोलिस कर्मचारी करोना संक्रमीत झाले आहेत. त्यापैकी २६८ जण उपचार घेऊन पूर्णतः बरे झालेले आहेत, ८८२ जणांवर अजूनही उपचार चालू आहेत, मात्र दु:खदायक बाब ही की १० पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.