मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
भारत हे लोकशाही राष्ट्र आहे, पण काश्मीरमधील भारताची वागणूक ही लोकशाहीसाठी हानीकारक आहे. काश्मीरमधील परिस्थिती भारताच्या धर्मनिरपेक्षतेशी विसंगत आहे. भारताने काश्मिरी लोकांचं म्हणणं संवादाच्या पातळीवर ऐकून घ्यावं. आंदोलन चिरडणं, इंटरनेट सेवा बंद करणं लोकशाहीला पूरक नाही, अशी भूमिका अमेरिकेत येऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रेटीक पार्टीचे उमेदवार तथा अमेरिकेचे पूर्व उपराष्ट्रपती जो बाइडेन यांनी मांडली आहे.
बाईडेन यांच्या प्रचार तंत्रज्ञान टिमने एक पॉलीसी पेपर प्रसिद्ध केला आहे. त्यात बाइडेन यांनी भारतातील काश्मिर प्रश्न आणि नुकतंच आसाममध्ये लागू झालेल्या एनआरसी, सीएएबद्धल आपली नाराजी व्यक्त केली आहे.
जो बाइडेन यांच्या प्रचार अभियान टिमने आपल्या वेबसाइट वर ‘जो बाइडन अजेंडा फॉर मुस्लिम अमेरिकन’ मध्ये भारताचाही उल्लेख केला आहे.
भारताच्या परमाणू करारामध्ये जो बाइडनचा महत्वपूर्ण सहभाग होता. ते उपराष्ट्रपती असताना भारत अमेरिका व्यापारी सबंध दर वर्षी ५०० अरब डॉलर पर्यंत वाढावेत, ह्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
News by MediaBharatNews Team